Google
 

Saturday, June 14, 2008

टपरी
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

तुला नकार दिल्यावर.....

तुला नकार दिल्यावर कलाल मला
खर प्रेम काय असत
आणि मज मन वेडच झाल

apron मला romio चा coat च वाटला
buret मधल NaOH च solution तुज्य डोल्याताले अश्रू आठवून गेल
conical flask burner ने heat करताना वाटल ....
तुही असा जळत नसशील ना विराहाच्या अग्नित

bio मध्ये heart observe करताना वाटल
मी तुज्या heart चे पण असे तुकडे तुकडे तर केले नाहीत ना....
slide मधल्या bacteria सारखा मन वलवालू लागल
prwan सारख hard मन sycon सारख soft झाल

physics मध्ये reading घेताना वाटल .....
मी तुज मन read करायला पाहिजे होत
पण म्हणतात ना प्रत्येक instrument मध्ये error हा असतोच
तसा त्याचाताही होता
मी त्याचात अदकत असताना
तो मात्र "ये नहीं तो और सही " म्हणत होता
आता मात्र ठारावल
प्रेम म्हणजे काय असत?
जे कधी करायच नसत
केल्यावर मग रदायाचा नसत
असल्या नसत्या धंद्यात पदायाचा नसत

नंतर कलाल तो माझा गैरसमज होता
त्याच plan success झाल
पण माझ्या डोलाना पानावल
अणि नंतर हळूच जवळ येवून म्हानतल
वेडू बाईच शहन्पण कलल
म्हनून म्हणतात ना
प्रेम म्हणजे काय असत
वायफल जायफल काहीही नसत
अकशातल ते चांदन असत
आयुष्याचा वाटे वरची साथ असत

पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
स्वप्न दाखवून स्वप्न तोडतेस तू,
डोळ्यातून अश्रु काढतेस तू,
अन् पुन्हा तेच पुसायलाही येतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

Tuesday, May 13, 2008

तुला माहित आहे का ......

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....

प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...

पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....

अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....

त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....

हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..

समोर काहीच दिसत नाही ...

पण मागे फिरावे की नाही ..

हे ही समजत नाही .....

पण या वाटेवर चालत राहण्याचा ...

मी प्रयत्न करेन ....

तुझ्या सोबत न रहता , तुझ्यामानत राहण्याचा प्रयत्न करेन ....

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....

यात आकर्षणाचा भाग नाही ..

पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...

माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..

पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....

पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..

दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ....

Sunday, February 24, 2008

चार लोकमान्य टिळक वा चार सावरकर उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थानाचे स्वप्न पुरे होणार नाही आणि समाज जागृतीचा पुरेसा प्रकाशही पडणार नाही.पुरेसा प्रकाश नि प्रभाव उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थान होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या पाहिजेत आणि आपल्या कार्याचे नि जीवनाचे तेल ओतले पाहिजे.

- स्वातंत्र्यवीर सावरकर