Google
 

Saturday, January 31, 2009

व.पु.KaaLe


स्वप्न

स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

___________________________________________________________________

एकाकी
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण . एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही। पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.

__________________________________________________________________

सगळे कागद सारखेच...त्याला अंहकार चिकटला की त्याचे Certificate होते.....

__________________________________________________________________

गगनभरारी

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो

त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो । असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यात्ल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोडावाते

_________________________________________________________________

वपूर्झा
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत

चार लोकमान्य टिळक वा चार सावरकर उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थानाचे स्वप्न पुरे होणार नाही आणि समाज जागृतीचा पुरेसा प्रकाशही पडणार नाही.पुरेसा प्रकाश नि प्रभाव उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थान होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या पाहिजेत आणि आपल्या कार्याचे नि जीवनाचे तेल ओतले पाहिजे.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

Saturday, June 14, 2008

टपरी
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

तुला नकार दिल्यावर.....

तुला नकार दिल्यावर कलाल मला
खर प्रेम काय असत
आणि मज मन वेडच झाल

apron मला romio चा coat च वाटला
buret मधल NaOH च solution तुज्य डोल्याताले अश्रू आठवून गेल
conical flask burner ने heat करताना वाटल ....
तुही असा जळत नसशील ना विराहाच्या अग्नित

bio मध्ये heart observe करताना वाटल
मी तुज्या heart चे पण असे तुकडे तुकडे तर केले नाहीत ना....
slide मधल्या bacteria सारखा मन वलवालू लागल
prwan सारख hard मन sycon सारख soft झाल

physics मध्ये reading घेताना वाटल .....
मी तुज मन read करायला पाहिजे होत
पण म्हणतात ना प्रत्येक instrument मध्ये error हा असतोच
तसा त्याचाताही होता
मी त्याचात अदकत असताना
तो मात्र "ये नहीं तो और सही " म्हणत होता
आता मात्र ठारावल
प्रेम म्हणजे काय असत?
जे कधी करायच नसत
केल्यावर मग रदायाचा नसत
असल्या नसत्या धंद्यात पदायाचा नसत

नंतर कलाल तो माझा गैरसमज होता
त्याच plan success झाल
पण माझ्या डोलाना पानावल
अणि नंतर हळूच जवळ येवून म्हानतल
वेडू बाईच शहन्पण कलल
म्हनून म्हणतात ना
प्रेम म्हणजे काय असत
वायफल जायफल काहीही नसत
अकशातल ते चांदन असत
आयुष्याचा वाटे वरची साथ असत

पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
स्वप्न दाखवून स्वप्न तोडतेस तू,
डोळ्यातून अश्रु काढतेस तू,
अन् पुन्हा तेच पुसायलाही येतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....

Tuesday, May 13, 2008

तुला माहित आहे का ......

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....

प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...

पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....

अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....

त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....

हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..

समोर काहीच दिसत नाही ...

पण मागे फिरावे की नाही ..

हे ही समजत नाही .....

पण या वाटेवर चालत राहण्याचा ...

मी प्रयत्न करेन ....

तुझ्या सोबत न रहता , तुझ्यामानत राहण्याचा प्रयत्न करेन ....

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....

यात आकर्षणाचा भाग नाही ..

पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...

माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..

पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....

पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..

दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ....

Sunday, February 24, 2008

चार लोकमान्य टिळक वा चार सावरकर उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थानाचे स्वप्न पुरे होणार नाही आणि समाज जागृतीचा पुरेसा प्रकाशही पडणार नाही.पुरेसा प्रकाश नि प्रभाव उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थान होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या पाहिजेत आणि आपल्या कार्याचे नि जीवनाचे तेल ओतले पाहिजे.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

Wednesday, November 28, 2007

~~~मन पाकोळ्यागत हलके~~~

मन पाकोळ्यागत हलके होउन उडुनी जाते
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन वादळ वारा
मन पाउस सारा.
मन हवा गुलाबी
मन नशा शराबी.

मन वा-यावरती झुलते तुझ्या भोवती फिरते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन उन कोवळे
मन रुप सावळे.
मन अगाध कोडं
मन अनाम ओढ.

मन लेउन पंख दिवाने तुझ्या आकाशी उडते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन श्रावणधारा
मन मोर पिसारा.
मन झाड आनंदी
मन फुल सुगंधी.

मन इन्द्रधनू सतरंगी रंगात रंगुनी जाते
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन थरथरणारे
मन भिरभिरणारे.
मन दीस सुगीचा
मन चांद नभीचा.

मन पाउसवेडे चकोर तुझ्या चांदणी न्हाते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन रेशीम धागे
मन अखंड जागे.
मन धुंद तराणे
मन वेडे शहाणे.

मन रडतानाही हसते तुझ्याचसाठी झुरते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

-अरुण नंदन
(22/11/07)

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

Original post from:
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2568720214916476229

कोणी मला athavate आहे

कोणी मला athavate आहे,मन परत गुन्त्हते आहे!
परतवादड भरून आले,पाहुसाचे थेम्बा gadat आहे!
कोणी मला athavate आहे,मन परत गुन्त्हते आहे!
परत कोणी भिजत आहे , ओले चिम्ब होत आहे!
कोणी मला athavate आहे,मन परत गुन्त्हते आहे!
तो थंडा गार मंदा वारा,अवती भवति चिक्खल्दारा!
कोणी मला athavate आहे,मन परत गुन्त्हते आहे!
योवनाचा तेज तिचा,सादगीनि परिपूर्ण!
कोणी मला athvate आहे,मन परत गुन्त्हते आहे!
प्रत्येक्शत नाही ती, पण आभासत आहे ती!
कोणी मला athvate आहे,मन परत गुन्त्हते आहे

Original post from:
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2568883857492004217

अलौकिक क्षण……

एक सुप्रभात होई हर्ष हर्ष…
अंगावरती एक मधुर स्पर्श…

बागेत एक निर्मल तुषार्…
भिजण्यासाठी पक्षी तयार…

पाण्यामध्ये एक श्वेत कमल…
किलबिल किलबिल चंचल मीनल…

फ़िरे मुक्त मुक्त स्वच्छंद कोणी…
पानांवरती थिजलेले मणी…

फ़ुलपाख़रांसवे उडे पराग कण…
असला हा एक अलौकिक क्षण…
असला हा एक अलौकिक क्षण…

- पराग
Original post from:
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2568735923763693700&start=1

टपरी

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

Original post from:
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=1716565&tid=2561774846971050374

Thursday, July 12, 2007

कोसळणारा पाऊस
कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी
यांचं असं का होतं ते कळत नाही
यांचं असं का होतं ते कळत नाही , किंवा यांना कळतं पण वळत नाही
निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार!
त्याचं कौतुक नसतंच मुळी कधी यांच्यासाठी
यांच्यासाठी एकच असते कपाळाला आठी!
कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥१॥

मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होते!
वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो!!
यांचा धोशा सुरू असतो -अमकं खाऊ नका त्याने डोकं जडसं होतं
तमकं पिऊ नका त्याने पडसं होतं
कधीसुद्द्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥२॥


सगळे कसे बागेत व्यायाम करत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार?
बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना!
गालाला गाल लावून गुलगुल करत असतंच ना!
असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच,
यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं,
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं!!
या कूट कोड्याचं उत्तर कधीच सुटत नाही, यांचं असं का होतं कळत नाही॥३॥

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच जागा ठरलेली, आणखी कुठे जाणार?!
कारण आणि परिणाम यांचं नातं ढळत नाही,
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळत पण वळत नाही ॥४॥

-मन्गेश पाडगावकर

Monday, July 09, 2007

marathi muli.....
company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असत
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....

गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,

तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....

अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,

चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....

आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,

चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

Tuesday, July 03, 2007

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय

Friday, June 29, 2007

Garava dialogs...सर्व गारवाप्रेमींसाठी
हेच ते शब्द जे मनाला भिडतात,
मनात खोलवर रुतुन बसतात..
जुन्या आठवणींना उजाळा देतात..
अन.....
आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यांसमोर उभे करतात!!!!

Wednesday, June 27, 2007

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात...
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात...
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला...
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला...
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो...
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो...
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी...
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी..